स्वराज्य रिक्षा संघटनेच्या वतीने इयत्ता दहावीत उत्कृष्ट गुणवत्ता मिळवून उत्तीर्ण झालेल्या मुलींना सायकल वाटप

दहावीमध्ये चांगली गुणवत्ता मिळवून उत्तीर्ण झालेल्या मुलींना उपप्रादेशिक कार्यालय अमित गुरव, आकाश गालीदे यांच्या हस्ते सायकल वाटप

सांगली, ता.६ : स्वराज्य रिक्षा संघटना जिल्हा सांगली यांच्यावतीने आज शुक्रवार (ता.६) रोजी सण २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावीमध्ये उत्कृष्ट गुणवत्ता मिळवून उत्तीर्ण झालेल्या मुलींना उपप्रादेशिक कार्यालय अमित गुरव, आकाश गालीदे यांच्या हस्ते सायकल वाटप करण्यात आले. आरटीओ चे आकाश गालिंदे व अमित गुरव यांच्याकडून मुलींना उत्कृष्ट गुणवत्तेबद्दल प्रत्येकी एक हजार रुपये बक्षीस म्हणून देण्यात आले तसेच त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

६ जून राज्याभिषेक असल्याने 352 व्या राज्याभिषेक निमित्त छत्रपती शिवरायांना पुष्पहार घालून अभिवादन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

  • चार मुलींना सायकल वाटप करण्यात आले.
  • १) श्रावणी दिगंबर दिनकर कदम (सांगली) ९१.४०%
  • २) जोया फीरोज कलावंत ( सांगली ) ८६.०० %
  • ३) श्वेता दिगंबर शिंदे ( पलूस ) ८४.६०%
  • ४) पूनम चंद्रकांत पाटील ( आटपाडी ) ७०.००%

२०२३ वर्षापासून स्वराज्य रिक्षा संघटना सांगली जिल्हा हा उपक्रम करण्याचे योजले. गेले दोन वर्षे २०२४ – २०२५ पासून स्वराज्य रिक्षा संघटना जिल्हा अध्यक्ष राम (भाऊ) पाटील व संघटनेचे सदस्य यांच्यावतीने इयत्ता दहावीत चांगली गुणवत्ता मिळवणाऱ्या रिक्षा चालकांच्या मुलींना सायकल वाटप करून ही सन्मान योजना चालु केली आहे. यावेळी रिक्षा संघटनेचे पदाधिकारी सदस्य व सभासद उपस्थित होते.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button