म्हैसाळ गावात विजेचा धक्का लागून एकाच कुटंबातील तिघांचा मुत्यु; एक जण जखमी

म्हैसाळ : रविवार दि.२९/०९/२०२४ रोजी सकाळी मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथे विजेचा धक्काने एकाच घरातील तिघांचा दुदैवी मुत्यू झाल्याची घटना घडली आहे.

या घटनेतील प्रदिप श्रीकृष्ण वनमोरे वय (३५), पारसनाथ वनमोरे वय (४०), शाहीराज पारसनाथ वनमोरे वय (१२) असे मुत्यु झालेल्यांची नावे असून हे सर्व राहणार म्हैसाळ त्यातील एक जखमी हेमंत वनमोरे वय (१५ ) याचा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहे. या दुर्देवी घटनेने म्हैसाळ गावावर शोककळा पसरली आहे.

घटनास्थळावरून मिळालेली प्राथमिक माहितीनुसार म्हैसाळ गावातील सुतारकी माळ या परीसरात वनमोरे परिवार यांची शेती असून शेतात पाणी पाजण्यासाठी पारसनाथ वनमोरे गेले होते. सदर ठिकाणी वीजेची वायर तुटून शेतात पडली होती. त्यामुळे पारसनाथ वनमोरे यांना विजेचा धक्का लागून त्यांचा मुत्यू झाला. त्यांचा मुलगा शाहीराज वनमोरे हा पारसनाथ यांच्या कडे गेला असता शाहीराज यालाही विजेचा धक्का लागलाने त्याचाही मुत्यु झाला. प्रादिप वनमोरे हे शेतातील घटनास्थळी जात असताना त्यांनाही विजेचा धक्का लागल्याने मुत्यू झाला. हेमंत वनमोरे हा जखमी झाला. ही घटना समजताच घटनास्थळी मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी यांनी भेट देऊन माहिती घेतली. सर्व मुतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे.

विजवितरण अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणा मुळे वनमोरे कुटुंबातील तीन जणांचा दुर्देवी मुत्यु झाला आहे. यामुळे हलगर्जीपणा करणाऱ्या संबधीत अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी वनमोरे कुटुंबीयांनी केली आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button