शरद पवार गटाकडून पिण्याच्या पाण्यासाठी इंदिरानगर, टिंबरएरिया मधील नागरीकांचा मनपा कार्यालयावर घागरी मोर्चा

सांगली : सोमवार दि.०९/०९/२०२४ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाकडून सांगली शहरातील इंदिरानगर, टिंबर एरिया, संजय नगर या भागात दुषित व अपुरा पाणीपुरवठा होत आहे इंदिरा नगर व सांगली शहर मध्ये स्वच्छ व मुबलक पाणी २४ तास मिळावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज साहेब व युवक शहर जिल्हाध्यक्ष राहुल (दादा) पवार, सामाजिक न्याय विभाग शहर जिल्हाध्यक्ष उत्तमराव कांबळे (आबा) यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली शहर जिल्हा उपाध्यक्ष भारत चौगुले व माजी समाज कल्याण सभापती विद्याताई उत्तमराव कांबळे यांच्या नेतृत्वाखाली सांगली महापालिका मुख्यालयावर घागरी मोर्चा काढुण आयुक्त साहेबांना निवेदन देण्यात आले.

यावेळी समशेर चौगुले, प्रविण चौगुले सुरेखा हेगडे, सुरेखा साबळे अमित मदारी, शशि लोंढे, राहुल लोंढे, राम चौगुले, अभिजीत रांजणे, संतोष चौगुले, शशिकांत चौगुले, हरी चौगुले, आदी नागरीक उपस्थित होते.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button